swami vivekananda che vichar
Swami Vivekanandanche Suvichar
Swami Vivekanandanche Suvichar
AUTHOR :- Rajiv Ranjan
स्थळ, काळ आणि देश-भाषांच्या सीमा ओलांडून मार्गदर्शक विचार सर्वव्यापी आणि शाश्वत असतात. आपल्या जीवनाला दिशा देण्यात या मौलिक सुविचारांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते. काय करावे आणि काय करू नये अशी गोंधळाची स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा महान व्यक्तीच आपणाला दिशा दाखवतात. त्यापैकी स्वामी विवेकानंद होत.
स्वामीजींना सामान्य माणसांविषयी अत्यंत तळमळ होती.
सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. तरुणांना ते संदेश देतात, “माझ्या तरुण मित्रांनो, शक्तिशाली व्हा,’ ठाम निश्चयाचे, तेजस्वी असे शंभर युवक जग हादरवून टाकू शकतात.
कारण जेव्हा एखादा विचार आपले मन, आपली बुद्धी इतकेच नव्हे तर देहातील कणन्कण भारून टाकतो तेव्हा यशाला त्या व्यक्तीकडे येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत.
